⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २१ मे इ.स.१६४९
(ज्येष्ठ वद्य पंचमी, शके १५७१, संवत्सर विरोधी, वार रविवार)
कान्होजी जेधे काकांना स्वराज्यात पाठवले !
स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांनी कान्होजी जेधे यांना स्वराज्यात पाठविले. स्वराज्य संकल्पनेचे जनक राजे शहाजीराजे यांनी कान्होजी जेधे नाईक यांना स्वराज्याच्या पुढच्या हालचालीसाठी व राजे शहाजीराजे यांचे पुढचे मनसुबे पार पाडण्यासाठी, "पुर्ण तयारीनिशी" पुण्याकडे अर्थात महाराजांकडे रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/LCkw-tvxG18?feature=share
📜 २१ मे इ.स.१६७२
कुतुबशहाकडून खंडणी घेऊन निराजीपंत किल्ले रायगडी परतले. कुतुबशाहीत सत्तासंघर्ष सुरू होता. त्यावेळी महाराजांनी लगेच निराजीपंत यांना गोवळकोंड्यास रवाना केले. महाराजांनी निराजीपंतांमार्फत अबुल हसनला गादीवर आणण्यासाठी प्रयत्न केला असावा. त्यामुळेच नव्या कुतुबशहाने महाराजांना सालीना १ लक्ष होनांची खंडणी कबूल केली. इतकेच नाही तर ६६ हजार २ नगदी निराजीपंतांसोबत लगेच पाठवूनही दिले. कुतुबशहाकडून ६६ हजाराची खंडणी घेऊन निराजीपंत किल्ले रायगडी परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ मे इ.स.१६७४
महाराज किल्ले प्रतापगडावरून किल्ले रायगडी परतले. १९ मे इ.स.
१६७४ महाराज श्रीभवानीस सव्वा मण सोन्याचे छत्र अर्पण करण्यास किल्ले प्रतापगडावर गेले होते महाराज किल्ले प्रतापगडावरून किल्ले रायगडी परतल्याचे वृत्त ऑक्झेडनला कळले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ मे इ.स.१६७५
(ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार शुक्रवार)
महाराजांनी कारवारचा फार मोठा प्रांत स्वराज्यात दाखल!
किल्ले फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. तीन हजार ३००० मराठा घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले. २६ एप्रिलच्या सुमारास मराठ्यांच्या सेनापतीने कारवारवर हल्ला चढवून तेथे लुटालूट केली. अंकोला व कोंद्रा किल्ल्यांनाही मराठ्यांनी घेरले. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात २१ मे इ.स.दरम्यान अंकोला व शेवेश्वर किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. अंकोला येथे झालेल्या लढाईत बाजी सर्जेराव जेधे यांनी तरवारीची कमाल केली. कोंद्रा, कारवार हेही महाराजांनी जिंकून घेतले. व कारवारपर्यंतचे विजापुरी कोकण पावसाळ्यापुर्वीच हिंदवी स्वराज्यात दाखल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ मे इ.स.१६९८
छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी कागलकर घाटगे घराण्यातील राजसबाई यांना २१ मे १६९८ रोजी पुत्रप्राप्ती झाली नाव संभाजी (दुसरा) ठेविले. संभाजी महाराजांनी कोल्हापूर राज्याची स्थापना केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ मे इ.स.१७४८
बाळाजीच्या वेळी जयपूर, उदेपूर, जोधपूर, बुंदी, कोटा इ. राजस्थानातील राज्यांत विलक्षण अंतर्गत कलहामुळे शिंदे –होळकरांविषयी तेथील राजांची मते विपरीत बनली. १७४८ पासून दक्षिणेतील घडामोडींत पेशवा गुंतला होता. आसफजाह निजाम –अल्-मुल्क २१ मे १७४८ रोजी मरण पावला. तदनंतर पेशवा-निजाम संघर्ष पुन्हा सुरू झाला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१५ डिसेंबर १७४९) रामराजा नानासाहेबाच्या मदतीने छत्रपतींच्या गादीवर आला. त्याने छत्रपती शाहूच्या याद्यांप्रमाणे बाळाजीच्या हाती सर्व कारभार सोपविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ मे इ.स.१७८६
२१ मे १७८६ रोजी मराठ्यांनी टिपूचा बदामीचा किल्ला काबीज करून त्याच्यावर चांगलीच कुरघोडी केली. ह्या प्रसंगी स्वतः नाना फडणीस मोहिमेत हजर होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀